राज्यात 12 ते 16 मेदरम्यान वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट – अनेक जिल्ह्यांना हवामान अलर्ट!– तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेचा इशारा

राज्यात 12 ते 16 मेदरम्यान वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट – अनेक जिल्ह्यांना हवामान अलर्ट!
– तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेचा इशारा

जालना | बोंद्रे ॲग्री टेक

राज्यात मागील आठवड्यापासून पावसाचा धडका देणाऱ्या अवकाळीने दोन दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपली झडपट सुरू करण्याची शक्यता वर्तवली आहे. 11 मेपासून अवकाळी पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा इशारा तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा, जालना यांनी दिला आहे.

11 मे रोजी दुपारनंतर हवामानात बदल होऊन काही भागांत मेघगर्जना, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, नाशिक, जालना, जळगाव, अहिल्यादेवी नगर परिसर, बुलढाणा, नांदेड, यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे.

12 ते 16 मे या काळात राज्यात दररोज बदलणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका राहणार आहे. विशेषतः खालील जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे:

मराठवाडा: जालना, बीड, छ. संभाजीनगर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव

विदर्भ: यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा

पश्चिम महाराष्ट्र: नाशिक, पुणे, सातारा

दक्षिण महाराष्ट्र आणि खानदेश: सर्व जिल्ह्यांमध्ये बदलत्या स्वरूपात पावसाची शक्यता

या काळात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची तीव्रता जास्त असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान अभ्यासक राजेंद्र तोडकर यांनी केलं आहे.

मान्सूनचा अंदाज:
तोडकर हवामान प्रयोगशाळेच्या अंदाजानुसार, 14-15 मेदरम्यान मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तो 8 दिवस आधी दाखल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

तथापि, मान्सून दरम्यान काही अडथळे जाणवू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात 12 जूनच्या सुमारास मान्सून स्थिर होण्याची शक्यता 65 ते 70 टक्के इतकी आहे.
शेतकऱ्यांनी 80-100 मिमी पावसाचा अनुभव आल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचा धोका वाढू शकतो, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.


शेतकऱ्यांसाठी सूचना:

आंबा, डाळिंब, भाजीपाला उत्पादकांनी वादळी वाऱ्यांपासून संरक्षणाची खबरदारी घ्यावी.

खत व बियाण्यांचे नियोजन हवामान पाहून करावे.

पेरणीस घाई करू नये. स्थिर आणि भरपूर पावसाची प्रतीक्षा करणेच हितावह.

  • बोंद्रे ॲग्री टेक न्यूज
    (तुमच्या कृषी विश्वासाचा भाग)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top